महिला कार्यकर्त्यांसमवेत  चारुलता टोकस
महिला कार्यकर्त्यांसमवेत चारुलता टोकस 
राज्य

`भाजपला रोडछाप गोंधळाशिवाय पर्याय नाही'

सरकारनामा ब्युरो

पुणे - ``अनेक नेते बलात्काराच्या आरोपात गुंतले असल्यामुळे भाजपाला अशा रोडछाप गोंधळाशिवाय पर्याय नाही,'' अशी टीका महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांनी भाजपवर केली आहे. 

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी झारखंडमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली. मोदींनी सुरू केलेली `मेड इन इंडिया' योजना आता `रेप इन इंडिया' झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून काल लोकसभेत भाजपने मोठा गोंधळ घातला. राहुल गांधी यांनी माफी मागवी, अशी मागणी केली. मात्र, भाजपची ही मागणी राहुल गांधी यांनी स्पष्ट फेटाळले. मोदींनीही दिल्लीचे वर्णन `बलात्काराची राजधानी' असे केले होते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनीच माफी मागावी, असे म्हटले होते. 

भाजपने घातलेल्या गोंधळाला उत्तर देताना टोकस यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की लोकसभेत खासदार राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत म्हणून बलात्कारासारख्या संवेदनशील विषयात बहुमताच्या जोरावर राजकीय गोंधळ माजवणे यासारखी लज्जास्पद गोष्ट नाही. परंतु अनेक नेते बलात्काराच्या आरोपात गुंतले असल्यामुळे भाजपाला अशा रोडछाप गोंधळाशिवाय पर्याय नाही आहे!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT